Sunday, 14 September 2014

मराठा साम्राज्य विस्तार

महाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे मराठे सरदार या साम्राज्याचे संरक्षण व विस्तार करण्याच्या कामी लष्करी मदत करण्याच्या करारावर अलीकडील ब्रिटिश साम्राज्यांतील वसाहतीप्रमाणे आपापल्या प्रांतांत संपूर्ण स्वराज्याचे हक्क चालवीत होते. महाराष्ट्रियांनी जे साम्राज्य स्थापिले त्याला एक प्रकारचे निश्चित धोरण होते त्याची फोड, ठोकळमानानें पुढीलप्रमाणे करता येईलः…

Review Overview

User Rating !

Summary : स्वराज्य म्हणजे खास शिवाजी महाराजांनी मिळविलेले राज्य; त्यानंतर सरंजामपद्धत निघून व काम केल्याबद्दल इनाम म्हणून जहागिरी परप्रांतांत मराठे सरदारांनी मिळविल्या (ही पद्धत राजारामापासून सुरू झाली, व पुढे पेशव्यांनी तीत भर टाकली); चौथाई सरदेशमुखी ही शिवाजी महाराजांनी प्रथम उत्पन्न केली आणि तिच्या आधारावरच पुढे सर्व पेशव्यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केले.

User Rating: Be the first one !
0

महाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य

महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे मराठे सरदार या साम्राज्याचे संरक्षण व विस्तार करण्याच्या कामी लष्करी मदत करण्याच्या करारावर अलीकडील ब्रिटिश साम्राज्यांतील वसाहतीप्रमाणे आपापल्या प्रांतांत संपूर्ण स्वराज्याचे हक्क चालवीत होते.

महाराष्ट्रियांनी जे साम्राज्य स्थापिले त्याला एक प्रकारचे निश्चित धोरण होते त्याची फोड, ठोकळमानानें पुढीलप्रमाणे करता येईलः
१६४० सालपर्यंत मराठयांचं धोरण मुसुलमानी अंमलाखाली मानमरातब मिळवून व जहागिरी उपभोगून थोडेसे स्वतंत्रपणे वागावयाचे होते. शिवाजीच्या वेळीं महाराष्ट्रापुरते लहानसेच पण पूर्ण स्वतंत्र असे स्वराज्य स्थापावयाचे व आणीक मिळविण्याचा प्रयत्न करावयाचा असा त्या धोरणांत फरक झाला. शिवाजी महाराज्यांच्याच्या पश्चात् शाहूराजे सुटून येईपर्यंत स्थापलेल्या राज्याचे औरंगझेबापासून हर प्रयत्नाने मराठयांनीं रक्षण केलें. शाहूपासून सवाई माधवरावापर्यंत, हें जुनें स्वराज्य सांभाळून, सर्व हिंदुस्थानावर आपली सत्ता स्थापण्याची व दिल्‍लीची मोंगल पातशाही नांवाला राखून प्रत्यक्ष व्यवहारांत आपली हिंदुपदपातशाही गाजवावयाची असे हे धोरण बळावले (आणि महाराष्ट्रीय साम्राज्याचा महत्त्वाचा काळ काय तो हाच आहे). पुढे रावबाजीपसून मराठयांचे साम्राज्यविस्ताराचे धोरण पुन्हां संकोचित होऊन, इंग्रजांपासून स्वराज्याचे संरक्षण करावयाचे व साधल्यास पुनरपि स्वातंत्र्य मिळवावयाचे हा प्रयत्न सुरू होता. १८१८ सालीं मराठी साम्राज्य अनेक कारणांनी लयास गेले. तेव्हांपासून आजतागायत हयात असलेल्या मराठी संस्थानिकांचे धोरण आरंभी सांगीतलेल्या स. १६४० पूर्वीच्या मराठयांच्या धोरणावर येऊन बसले आहे.

शिवाजी महाराजांचे साम्राज्य

शिवाजी महाराजांनी स्थापण्यास आरंभ केलेल्या राज्याचे मूळ म्हणजे पुणे, सुपे, इंदापूर, ही त्याची लहानशी जहागीर होय. या प्रदेशाचे ठोकळ क्षेत्रफळ २३०० चौरस मैल आहे. तीस वर्षांत त्याच्या राज्याचा विस्तार कल्याण ते गोवे, भीमा ते वारणा यांमधील १५००० चौरस मैलांवर पसरला, आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी तर पुढील प्रांताचा समावेश मराठी राज्यांत झाला होता, मावळ, वाई, सातारा, पन्हाळा, दक्षिणकोकण, बागलाण, त्र्यंबक, धारवाड, बिदनूर, कोलार, श्रीरंगपट्टण, कर्नाटक, वेलोर व तंजावर या देशांतील मिळून एकंदर २६७ किल्ले. राज्याची ठोकळ चतुःसीमा पूर्वेस भीमा; पश्चिमेस अरबी समुद्र; उत्तरेस गोदावरी; व दक्षिणेस कावेरी होय. या एकंदर प्रदेशाचे क्षेत्रफळ साधारणपणे १२०००० चौरस मैल येईल व उत्पन्न दीड ते पावणेदोन कोटी रुपयांचे होते.

नंतरचे साम्राज्य

शिवाजी महाराजांच्या प्रश्चात् मराठी राज्य दक्षिणेकडे फारसे वाढले नाही, उलट हैदर, टिप्पू, इंग्रज हे प्रबळ झाल्यावर थोडे फार कमीच झाले. त्यावेळी साम्राज्यविस्ताराचा भर उत्तरेस व पूर्वेकडे होता. उत्तरेस राजपुताना धरून पंजाबपर्यंत, व पूर्वेस बंगालपर्यंत असा (साडेपाच लक्ष चौरस मैल) हा विस्तार होता. त्यावेळी उत्तर हिंदुस्थानांत एकंदर १५ सुभे असून त्यांचा वसूल ३२ कोटी, ४६ लक्ष होता; दक्षिणेत ६ सुभे असून सर्व हिंदुस्थानच्या या २१ सुभ्यांचा वसूल ५० कोटी, ७३ लक्ष होता. त्यांत मराठी साम्राज्याचा वांटा १२ कोटी ४२ लक्ष २० हजारांचा होता. हे आंकडे इ.स. १८०३ च्या वेळचे आहेत. सारांश, शिवाजी महाराजांच्या जहागिरीचे रूपांतर होऊन जे मराठी साम्राज्य वाढले ते त्याच्या मूळच्या जहागिरीच्या २३९ पट वाढले व उत्पन्न ५४ हजार पटीने वाढले.

साम्राज्य विस्ताराचे प्रकार

मराठी साम्राज्याचा विस्तार जो झाला तो निरनिराळया रीतींनी झाला
(१) स्वराज्य
(२) जहागिरी व वसाहती
(३) चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्याच्या हक्काचा मुलूख
(४) केवळ खंडणी वसूल करण्याचा म्हणजे मांडलिक राजांचा मुलूख
(५) घांसदाणा मिळविण्याचा मुलूख व
(६) मुलूखगिरीचा मुलूख
स्वराज्य म्हणजे खास शिवाजी महाराजांनी मिळविलेले राज्य; त्यानंतर सरंजामपद्धत निघून व काम केल्याबद्दल इनाम म्हणून जहागिरी परप्रांतांत मराठे सरदारांनी मिळविल्या (ही पद्धत राजारामापासून सुरू झाली, व पुढे पेशव्यांनी तीत भर टाकली); चौथाई सरदेशमुखी ही शिवाजी महाराजांनी प्रथम उत्पन्न केली आणि तिच्या आधारावरच पुढे सर्व पेशव्यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केले.

‘आज चौथाई सरदेशमुखीचा अंमल बसतो, पुढे संस्थान आपले होते’ हा तर मराठयांचा साम्राज्यधोरणाचा महामंत्र होय. बुंदेलखंडांतील व राजपुतान्यांतील आणि कर्नाटकांतील पुष्कळसे लहान राजेरजवाडे मराठयांना आपले सम्राट म्हणून मानीत. दिल्‍लीच्या बादशहाचे गुमास्ते किंवा सेनापती म्हणून मराठे हिंदुस्थानांतील इतर राजेरजवाडयांपासून प्रांताचा वसूल घेत. या जोरावर त्यांनी इंग्रजांकडे सबंध बंगालच्या चौथाईची मागणी केली होती. ज्या आदिलशाहीचा एक सरदार म्हणून प्रथम शिवाजी राजे होते, त्याच आदिलशाहीनें पुढे त्यांना सालीना खंडणी देऊन त्याचे स्वतंत्र राजेपण मान्य केले.

विस्तार कसा होत गेला

विस्तार केव्हां व कसा झाला याची साग्र माहिती येथे देता येत नसल्याने ठोकळ मानाने सांगतो. शिवाजीच्या मृत्यूच्या वेळीं राज्याचा विस्तार किती होता तो वर दिलाच आहे. संभाजी, राजाराम व दुसरा शिवाजी यांच्या कारकीर्दीत औरंगझेबाच्या स्वाऱ्यांमुळें या राज्याचा कांही काळ बराच संकोच झाला; मात्र कायमचा झाला नाही. कारण औरंगझेबाने मराठी मुलूख एकदां जिंकून पुढील प्रांत घेण्यास चाल केली की, मराठयांनीं पुन्हां आपला गेलेला प्रांत परत जिंकून घ्यावा; तरीपण बराचसा कर्नाटकाचा भाग मोंगलांनी कायमचा घेतला (१६८०-१७०७). त्यामुळे मराठी राज्याच्या वसुलाला बरीच खोट बसली (कारण कर्नाटकप्रांत पुष्कळ श्रीमंत असे). तसेच कुतुबशाही व आदिलशाही मोंगलांनी बुडविल्याने तिकडून येणाऱ्या खंडण्यांसहि मराठयांस मुकावे लागले. या सुमारास निझामाने महाराष्ट्रांत आपले ठाणे देऊन एव्हांपासून पेशवाईअखेरपर्यंत संधि सापडली म्हणजे मराठी राज्याचे लचके तोडण्याचे काम चालू ठेविले. शाहु गादीवर आल्यावर प्रथम बाळाजी विश्वनाथाने चौथे-सरदेशमुखी व स्वराज्याच्या सनदा आणिल्या, आणि मग बाजीरावानें सय्यदबंधूंच्या भानगडीचा फायदा घेऊन माळवा, गुजराय, बुंदेलखंड, वऱ्हाड या प्रांतांत हातपाय पसरले. थोडयाच काळांत हे प्रांत व राजपुतान्यांतील कांही मुलूख मराठी राज्यांत पूर्णपणे सामील झाला. हिंदुपदपातशाहीच्या चढाईच्या धोरणास बाजीरावानें सुरवात केली. बरेचसे रजपूत राजे मराठयांचे मित्र व कांही मांडलिकहि बनले आणि शाहू गादीवर येण्यापूर्वी मराठी राज्याचा जो विस्तार होता, त्याच्या दुप्पट विस्तार बाजीरावाच्या मृत्यूच्या वेळी झाला. नानासाहेब पेशव्यांनी कांही दिवस उत्तरेकडे लक्ष घालून अंतर्वेदि, पंजाब, ओरिसा, संयुक्तप्रांत या प्रदेशांतील बराचसा मुलूख हाताखाली घातला. या वेळीं तर दिल्‍लीच्या बादशहाने स्वतःसाठीं कांही नेमणूक ठरवून पेशव्यांस आपल्या रक्षणाचें व राज्यकारभार करण्याचें काम सांगितले आणि ते काम शिंदे, होळकर यांनी पेशव्यांतर्फे पार पाडले. दिल्‍लीची मोंगल पातशाही पुण्याच्या हिंदुपातशाहीच्या पंखाखाली प्रथम जी गेली ती याच सुमारास. उत्तरेकडे याप्रमाणें अंमल बसल्यावर नानासाहेबांनीं दक्षिणेकडे लक्ष घालून कर्नाटक मिळविण्याचा उद्योग केला आणि ‘उत्तरेकडील व दक्षिणेकडील सुवर्णनद्यांचा संगम मध्यें पुण्यास केला.’ कर्नाटकचे नबाब, निझाम, फ्रेंच, इंग्रज यांच्या भांडणाचा फायदा घेऊन नानासाहेबांनी कर्नाटकांतील शिवरायांनी मिळविलेल्या प्रांतापैकी जवळ जवळ १/४ प्रांत परत घेतला. निझामाकडूनहि उदगीरच्या लढाईंत खानदेश, नगर व विजापूर वगैरे जिल्ह्यांतील ६२॥ लक्षांचा मुलूख घेतला; इतक्यांत पानिपत होऊन उत्तरेकडील मराठयाच्या अंमलास धक्का बसला, परंतु थोरल्या माधवरावानी २३ वर्षांच्या अवधींत पुन्हा आपला गेलेला प्रांत परत मिळविला आणि पुनरपि दिल्‍लीच्या बादशहास आपल्या लगामीं लाविले. यानंतर सवाई माधवरावाच्या वेळीं शिंदे, होळकर, भोंसले या उत्तरेंतील सरदारांनीं दिल्‍लीच ताब्यांत घेऊन, नानासाहेबांच्या वेळचा तिकडील सर्व प्रांत हस्तगत केला आणि दक्षिणेंतही कर्नाटक मोकळे करून निझामाकडून खडर्याच्या लढाईत ४० लक्षांचा मुलूख घेऊन बहुतेक निझामाचे राज्य खालसा केले माधवरावाच्या कारकीर्दीत सर्व मराठी साम्राज्याचा वसूल २० कोटीपर्यंत असावा व विस्तार प्रत्यक्षाप्रत्यक्ष सर्व हिंदुस्थानच्या ३/४ भागावर असावा. रावबाजीच्या वेळच्या वसूलाचा आकडा मागे दिलाच आहे.

साम्राज्याचा कारभार

शाहूंच्यापर्यंत छत्रपती स्वतः राज्यकारभार पहात असत. त्याच्या मदतीला अष्टप्रधान ही संस्था असे. ती साधारणपणे सांप्रतच्या इंग्लंडच्या कॅबिनेटच्या पद्धतीची असे. ही एक प्रकारची एकमुखी (राजाच्या हुकमतीखालची) राजशासनपद्धति होती. प्रजेला त्यात फारशी भागीदारी नसे. सामाजिक बाबतींत ग्रामपंचायती सर्रहा अमलांत असल्यानें राजा तींत हात घालीत नसे. प्रजेच्या राजकीय हक्काची कल्पना व सांप्रत आपण पहातों तशी तिला अनुसरून केलेली योजना १७ व्या शतकांत यूरोपमध्येंहि अंमलांत नव्हती. मात्र एकोणिसाव्या शतकांत तिकडे ती अमलांत आली असता हिंदुस्थानांत (अर्थात मराठी साम्राज्यांत) तिची कोणीहि ओळख करून घेतली नाही. मराठी साम्राज्यांत परदरबारचे प्रांत जिंकून तेथे जे मराठी सरदार रहात असत, ते छत्रपती (अथवा पेशवे) चे नोकर अथवा मांडलिक म्हणून असून त्यांना जबाबदार असत; परराज्याशीं तह अथवा लढाई करण्याचें स्वतंत्र अखत्यार त्यांस नसत. दत्तकाची परवानगी हि या मध्यवर्तीसरकारकडून घ्यावी लागे; हा नियम मराठी साम्राज्याचे राजपुतान्यांतील, बुंदेलखंडांतील, कर्नाटकांतील व इतर प्रांतांतील जे मांडलीक राजे होते त्यांनाही लागू होता. परकीय शत्रूपासून संरक्षणाच जबाबदारी साम्राज्यास घ्यावी लागे व त्याबद्दल त्यांच्याकडून खंडणी मिळे. त्यांना साम्राज्य सांगेल तितकी फौज साम्राज्यसेवेसाठीं ठेवावी लागे. शिंदे, होळकर, भोंसले वगैरे या साम्राज्याचे सरदार म्हणजे आजचे गव्हर्नर, यांना आपल्या जहागिरीचे हिशेब मध्यवर्तीसरकारांस द्यावे लागत. शाहूंनी मृत्यूसमयी आपल्याच हाताने नानासाहेब पेशव्यांस साम्राज्याची कुलअखत्यारी दिल्यापासून पुण्यास मध्यवर्ती सरकारची गादी स्थापन झाली. प्रथम हे सरदार पेशव्यांनां हा मान देण्याचा नाखूष असत, परंतु पेशव्यांनी सर्व साम्राज्याची सत्ता एकमुखी करून आपल्या हाती आणली. या सरदारांना आपल्या प्रांताच्या वसुलापैकी कांही ठराविक रक्कम साम्राज्यसरकारांत भरावी लागे. यांना ठराविक लष्कर ठेवण्याबद्दल सरंजाम तोडून दिलेले असत. यांच्याशिवाय लहान लहान जहागीरदार, इनामदार लोक असत, त्यांना लष्करी नोकरी माफ असे. मात्र वेळप्रसंगी वसुलांत १/४ १/४ (पाव भाग) असा पैका सरकारांत भरावा लागे.

लष्कर व आरमार

लष्कराला (घोडदळ, पायदळ, तोफखाना) पगार काय असे त्याची एकंदर व्यवस्था कशी असे हे पहावयाचें असल्यास खऱ्याचे ऐ. ले. सं. चे भाग पहावेत. खडर्याच्या लढाईंत मराठी साम्राज्याचें लष्कर सर्वांत जास्त होते (१ लाख, १३ हजार) आणि पानपतच्या वेळी ७० हजार होते. इ.स. १८०० च्या सुमारास साम्राज्याचे लष्कर २,७४,००० होते. सरदार, सरंजामदार, इनामदार यांचा लष्कराच्या बाबतीत साम्राज्याशी कसा संबंध असे, ते वर सांगितलेच आहे. आरमाराचे महत्त्व शिवाजी महाराजांनी ओळखून त्याचा उपयोग करून घेतला. पेशव्यांनींहि तेंच धोरण पुढे चालविले. थोडया फार फरकाने पेशवाईअखेरपर्यंत कोंकणकिनाऱ्यावर मराठी साम्राज्याचे वर्चस्व होते. अखरीच्या सुमारास इंग्रजांनी अंमल बसवियास सुरवात केली. कान्होजी आंग्रेयांना तर इंग्रज, फिरंगी हे चळवळा कापत असत. नानासाहेब पेशव्यांनीं एक चूक करून आंग्रेंना हतप्रभ केले व इंग्रजांना कोंकणांत हात घालावयास सवड दिली. पण नानसाहेबांच्या या चुकीस एक कारण होते, नानासाहेब हा मराठी साम्राज्याचा मुख्य अधिकारी होता, अर्थांत त्याच्या अनुरोधाने सर्व सुभेदार, सरदार, अंमलदार यांनीं चालावयास पाहिजे होते. परंतु ते कांहीं चालत नसत. त्यांत कान्होजीही एक होते. ते नानासाहेबांच्या आखलेल्या आरमारी योजनांच्या धोरणास विरोध करी, म्हणून त्याच्या हातून आरमारी सत्ता काढून घेणे श्रीमंतांस भाग होते. त्याप्रमाणे ती हाती आल्यावर पेशव्यांनी आरमाराचा सुभा धुळपास देऊन ती एक बाब कह्यांत ठेवली. हैदरटिप्पूवरील व शिद्दी-पोर्तुगज यांच्यावरील स्वाऱ्यांत पुढे या आरमाराचा साम्राज्याला फार उपयोग झाला. या आरमारांत ४०० टनपर्यंतची लढाऊ जहाजे असत आणि त्यांवर ५ पासून ५० पर्यंत तोफा असत. एका विजयदुर्गच्या आरमारी सुभ्यांतच ३ हजारापर्यंत नाविक दळ होते.

व्यापारी धोरण

मराठी साम्राज्यांत व्यापारास पुष्कळ प्रकारांनी उत्तेजन देण्यांत येई. इंग्रज, फिरंगी वगैरे परकीय व्यापाऱ्यांस फार सवलती असत; व्यापारी मालावर जकात थोडी असे. दुष्काळ वगैरे पडल्यास सरकार व्यापाऱ्यांना ठराविक स्वस्त दरानें विक्री करण्यास सांगे व प्रसंगविशेषी स्वतःही दुकाने काढून प्रजेचा जीव वाचवी. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा व्यापार सरकारने आपल्या हातीं ठेविला होता. साम्राज्याच्या वसाहतींना व नोकरांना जकातीच्या बाबतीत बऱ्याच सवलती असत. माळवा, बुंदेलखंड, वऱ्हाड, खानदेश, मावळ, कर्नाटक वगरे प्रांत निरनिराळया हवापाण्याचे व निरनिराळे पदार्थ व वस्तू उत्पन्न होणारे असल्याने अनेक दृष्टींनी साम्राज्यांतून सुबत्ता नांदत होती.

साम्राज्याची दरबारी भाषा अर्थातच मराठी होती. मात्र इंग्रज, मोंगल, टिप्पू वगैरे परराजांशी पत्रव्यवहार फारशी भाषेंत होय. ते दरबारही मराठी साम्राज्याशी पत्रव्यवहार फारशीतच करीत. पण याखेरीज साम्राज्यांत सर्वत्र मराठी भाषा वापरीत. लेखन मोडी लिपीत चाले. वसाहती केलेल्या लोकांनी मराठी भाषेबरोबरच मोडी लिपीचाही प्रसार हिंदुस्थानांत सर्वत्र केला. मद्रासकडे ५०-६० वर्षांपूर्वी व म्हैसून कडे २५-३० वर्षांखली इंग्रज व म्हैसूरकारांच्या कचेरीतील बरेंचसें लिखाण मोडींत चालू होते आणि अद्यापिही कर्नाटकांत जमाखर्चांत भाषा कानडी परंतु लिपी मोडी असा प्रकार आढळतो.

संदर्भ: महाराष्ट्रीय ज्ञानकोश खंड १८ बडोदे – मूर (१९२६) व नकाशा Maps of India

महाराष्ट्रीय उर्फ मराठी साम्राज्य महाराष्ट्राबाहेर महाराष्ट्रीयांचा अम्मल जेथे जेथं होता त्या सर्व प्रदेशाला मिळून महाराष्ट्रीय किंवा मराठी साम्राज्य म्हणतात. तथापि या सर्व प्रदेशावर सातारच्या राजाची अनियंत्रित सत्ता (अकबर, औरंगझेबाप्रमाणें) नव्हती आणि त्याचें मुख्य प्रधान जे पुण्यास रहाणारे पेशवे यांच्या हातीं जरी राज्यकारभाराची मुख्य व्यवस्था होती, तरी साम्राज्यांतील निरनिराळया भागांत मराठयांनी वसाहती स्थापून कोल्हापूरकर व नागपुरकर भोंसले, शिंदे, होळकर, गायकवाड, वगैरे मराठे सरदार या साम्राज्याचे संरक्षण व विस्तार करण्याच्या कामी लष्करी मदत करण्याच्या करारावर अलीकडील ब्रिटिश साम्राज्यांतील वसाहतीप्रमाणे आपापल्या प्रांतांत संपूर्ण स्वराज्याचे हक्क चालवीत होते. महाराष्ट्रियांनी जे साम्राज्य स्थापिले त्याला एक प्रकारचे निश्चित धोरण होते त्याची फोड, ठोकळमानानें पुढीलप्रमाणे करता येईलः…

User Rating !

Summary : स्वराज्य म्हणजे खास शिवाजी महाराजांनी मिळविलेले राज्य; त्यानंतर सरंजामपद्धत निघून व काम केल्याबद्दल इनाम म्हणून जहागिरी परप्रांतांत मराठे सरदारांनी मिळविल्या (ही पद्धत राजारामापासून सुरू झाली, व पुढे पेशव्यांनी तीत भर टाकली); चौथाई सरदेशमुखी ही शिवाजी महाराजांनी प्रथम उत्पन्न केली आणि तिच्या आधारावरच पुढे सर्व पेशव्यांनी हिंदुस्थान पादाक्रांत केले.

User Rating: Be the first one !
0

शिवरायांची जगभरातील इतिहासकरांनी केलेली वर्णने

“शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते.”
- कोस्मा दी गार्डा

“शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे तर चढाईचेही खेळतो.”
- गोव्याचा व्हाईसराँयने पोर्तुगालच्या राजास लिहिलेले पत्र २४ जानेवारी १६८०

“शिवाजीचे डोळे अतिशय तीक्ष्ण व विलक्षण तेजस्वी आहेत. त्याची बुद्धीमत्ता त्यातुन व्यक्त होते. तो दिवसातून एकच वेळ सामान्यतः भोजन करतो. तरीही त्याचे आरोग्य उत्कृष्ट आहे.”
-जिन दि तेवनो

“स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत.”
- डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार)

“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे.”
- प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड)

(दुर्ग-खंड पहिला पुस्तकातुन)

"शिवाजी केवळ काम करण्याची तडफ असलेला पुरूष नसून, त्याचे शरीरही डौलदार आहे. त्याच्या चेहरा आकर्षक आहे आणी निसर्गतः त्याचे व्यक्तित्व अत्यंत परिपूर्ण आहे. विशेषतः त्याचे काळेभोर आणी विशाल नेत्र इतके विलक्षण भेदक आहेत की तो टक लावून पाहू लागला तर त्यातून ठिणग्या बाहेर पडतात की काय असे वाटते. त्याचबरोबर तरल, तीक्ष्ण, स्पष्ट आणि तंतोतंत निर्णय करणारी त्याची प्रतिमाही व्यक्त होते." - कोस्मा दी गार्डा "शिवाजीने उत्तरेस दमण आणी खाली गोवा ह्या आमच्या दोन्ही प्रदेशामधला सर्व मुलुख काबीज केला आहे. हिंदुस्थानच्या हा अँटिला(प्रख्यात हूण नेता) च्या चातुर्याची आणी पराक्रमाची स्तुती करावी तितकी थोडीच आहे. तो केवळ बचावाचेच खेळ खेळतो असे नव्हे…

Saturday, 28 June 2014

Shivaji's historic meeting with the Bijapuri General Afzal Khan (10th November 1659)

Afzal Khan, the dreaded Bijapuri Commander, had advanced from Bijapur to Wai laying waste the whole country. His march till Wai had been an unrelieved calamity. Shivaji's men had not till now faced a regular army equipped with artillery etc. At the first council he called, Shivaji found that every one around him was scared of the bold bad man "who would shrink from no act of cruelty and treachery". They all advised him to make peace. But how could he trust a man like Afzal Khan who had murdered Kasturi Ranga, the Raja of Sera, whom he had invited to his tent under promise of safety to make submission. Also it meant submission to Bijapur and ruining all his dreams of establishing "Swarajya".

This was a most critical moment in Shivaji's career. If he submitted to Afzal Khan, all his hopes of independence and future greatness would be gone for ever. If he declined to negotiate, it would mean war with Bijapur. Shiva was in a dilemma. After pondering for a fortnight, he decided to meet Afzal Khan alone at a meeting. A legend says that the care-worn Maratha fell asleep in which statehe had a vision of goddess Bhawani who urged him to face Afzal Khan boldly. On waking up Shivaji decided in favour of hostilities with Bijapur. He however agreed to meet the Khan, who, it is believed, had hoped to arrest or kill Shiva at the interview, not at Wai but near th fort of Pratapgarh. Afzal Khan agreed.

On Shivaji's orders, an open pavilion, richly decorated was erected on the crest of an eminence below the fort of Pratapgarh. Shivaji prepared himself for any eventuality. To prevent detection of the steel claws in the palm of his left hand and a short dagger up his right hand sleeve, he had put on a long white flowing robe with broad long sleeves.

Shivaji now insisted that Afzal Khan should come to the tent for meeting accompanied by only two body-guards and that he too would come with only two body-guards, accompanied by their respective Brahmin envoys.

When Shivaji was coming out of Pratapgarh fort, his mother blessed him saying that victory would be his. At the time of the meeting on 10th November 1659, only Afzal and Shivaji were present in the tent. The body-guards and the Pandits were below the platform.

We have a detailed account of the high drama which resulted in Afzal Khan's death and rout of his army. Afzal, a tall and well-built man, was first to arrive in the tent pitched for his reception. Shivaji was seemingly unarmed "like a rebel who had come to surrender, while the Khan had his sword and dagger at his side … Shivaji mounted the raised platform and bowed to Afzal. The Khan rose from his seat, advanced a few steps, and opened his arms to receive Shiva in his embrace. The short slim Maratha's head came only up to the shoulders of his opponent. Suddenly, Afzal tightened his clasp, and holding Shiva'a neck fast in his left arm with an iron grip, while with his right hand he drew his long straight-bladed dagger and struck at the side of Shiva. The hidden armour rendered the blow harmless. … In a moment Shiva recovered from the surprise, passed his left arm round the Khan's waist and tore his bowles open with a blow of the steel claws. Then with the right hand he drove the bichwa into Afzal's side ….. Shivaji jumped down from the platform and ran towards his own men outside. The Khan cried out ":Treachery! Murder! Help! Help! The attendants ran up from both sides; Saiyid Banda faced Shivaji with his long straight sword and cut his turban in two, making a deep dint in the steel cap beneath. Shivaji quickly took a rapier from his bodyguard, Jiv Mahala, and began to tarry. But Jiv Mahala came round and cut off Saiyid's right hand and killed him.

Meanwhile the bearers placed the wounded Khan in his palquinand started for his camp. But Shambhuji Kavji slashed at their legs, made them drop the palquin and then cut off Afzal Khan's head, which he carried in triumph to Shivaji.

Thus Shivaji by endangering his own person extricated his nascent kingdom from a very dangerous situation by turning back the tide of the Bijapuri troops and by outwitting the dreaded Afzal Khan.

In the next painting the artist has tried to recreate the wholesequence of events.

The Scene of Mughal devastation in the Deccan - Shivaji Changes People's Psychology ....

Shivaji's life and achievements were such as to thoroughly justify Carlyle's "Great Man Theory". Before Shivaji, the scene in Maharashtra was one of sadness, helplessness, suffering and humiliation at the hands of the Muslim powers. This is best described in the words of Sabhasad, a contemporary observer and the author of Sabhasad Bakhara.

"Shivaji brought home to the minds of his people how the foreign Muslim rule inflicted hardship and wrongs upon their homeland and their religion. He narrated to them graphic stories of what he had seen and heard. Was it not their duty to avenge the wrong? Even an effort in that direction was necessary and laudable. Why remain content with the gifts conferred by the foreigners or with their own paternal acquisitions only? We are Hindus; this whole country is ours, and yet it is (still) occupied and held by the Muslims. They desecrate our temples, break our idols, loot away our wealth, forcibly convert our people to their religion, kill cows openly. We will suffer this treatment no more.

"We possess strength in our arms. Let us draw the sword in defence of our sacred religion, liberate our land, and acquire new areasand wealth by our own efforts. We are as brave and capable as our ancestors in old times. If we undertake this sacred task, God will surely help us. All (noble) human efforts are so helped. There is nothing like good luck or bad luck. We are the masters of our soil and makers of our freedom".

Shivaji's message was no demagogue's attempt to win people to hispoint of view. His depiction of the oppression under Muslim rule was a reality. Sardesai, the eminent Maratha historian, gives the contents from an old (17thcentury) paper thus: "Complete darkness prevails under Muslim rule. There is no fair ascertainment of facts nor justice. The officials do what pleases them. Violation of the honour of women, murders, (forcible) conversion of the Hindus, demolition of temples and shrines, cow-slaughter, and similar (low and despicable) acts and atrocities prevail under that (Mughal, Bijapur?) government". These feelings were strengthened by actual events. Thus Nizam Shah (Bijapur) had openly murdered Jija Bai's father, his brothers and sons. Bajaji Nimbalkar of Phaltan was forcibly made a Musalman.

These were bold and stirring words, and did not fail to ignite the fire of freedom and desire for regaining the lost honour, in the masses, a fire which ultimately engulfed the whole Mughal empire and made it dependent on the support of the Marathas. Shivaji was thus the father of the Freedom Movement in Maharashtra and a source of inspiration to the Hindus throughout India. When he visited Agra, and later Haidarabad, the Hindus looked upon him with utmost pride and admiration. Yet his war against the Mughals and Bijapur was not against Muhammadans in general or their religion but for the honour and rights of the Hindus and their religion, then both being discriminated against and suppressed under inspiration and direction of a foreign religion, culture and values.

Shivaji was right in thinking that only by arms would his people be able to secure their rights which were far superior to those of the foreign intolerant Muslim rulers – Mughal, Nizam Shahi or Qutb Shahi. Shivaji thus changed the psychology of the masses, assisted by the awakening created by the saints of Maharashtra, and filled them with fresh confidence to fight the Muslim rulers and wipe off their rule. His words, matched by action, transformed the Marathas into a nation before which he eloquently placed "the higher ideal of Swarajya, and political emancipation from the chains of grinding slavery that held down his country for centuries together".

The first painting depicts the scene of Mughal devastation in the Deccan as described in the 17th century paper mentioned above.